भंपक पत्रकारांची शाई 'वाळली' का ?

माझी 'शेळीचे कलम 420' ही कादंबरी येणार आहे आणि त्यातील हा सारांश असे सांगणाऱ्या एका भंपक पत्रकाराला दीड लाख रूपये मिळताच त्यांची शाई वाळली का,असा प्रश्न नव जागृतीचे कर्मचारी विचारत आहेत....
नव जागृतीच्या मालकाने वरिष्ठांना हाडूक टाकून त्यांना गप्प केले असले तरी,बेरक्या गप्प बसणार नाही.
सर्व कर्मचाऱ्यांना आणि स्ट्रींजरचा जून अखेर पगार झालाच पाहिजे आणि अचानक चॅनल बंद केल्यामुळे तीन महिन्याचा पगार दिला पाहिजे,ही कर्मचाऱ्यांची भूमिका आहे, आणि या भूमिकेला बेरक्याचा पाठींबा आहे...


...............

'जागृती फुड्स' च्या नावाखाली हजारो गुंतवणूकदरांना कोट्याधीश बनण्याची स्वप्न दाखवणारे आणि चॅनलच्या माध्यमातून थेट पत्रकारांनाच ठकवणारे राज गायकवाड यांनी स्वत;चे बिंग फुटू नये यासाठी नवी "आयडियाची कल्पना". 
विरोधात तसेच भांडाफोड करणाऱ्या बातम्या येऊ नये म्हणून सरळ काही मराठी न्यूज चॅनलवर जागृती अग्रो फूडच्या जाहिराती झळकवायला सुरुवात...

.............

नव जागृतीच्या राज गायकवाड यांनी आपली वाकडी चाल अजूनही सोडलेली नाही.सोमवारी कर्मचा-यांचे आणि स्ट्रींजरचे पेमेंट केले जाईल असे आश्वासन दिलेल्या गायकवाडांनी सोमवारी काही मोजक्याच कर्मचा-यांचे पेमेंट केले आणि अन्य कर्मचा-यांना ताटकळत ठेवले आहेत.
बिचारे कर्मचारी अजूनही आशेवर आहेत,परंतु खोटी कारणे सांगून गायकवाडांनी त्यांची जीवाशी खेळणे सुरू ठेवले आहे.
अनेक कर्मचा-यांना अजूनही एप्रिल,मे आणि जून महिन्याचे पेमेंट मिळाले नाही.काही ना एप्रिलचे मिळाले आहे.त्यांच्यात फुट पाडण्याचा कुटील डावही गायकवाड खेळत आहेत.
दरम्यान नव जागृती चॅनल बंद पडल्यामुळे जागृती अ‍ॅग्रो फुडस्मध्ये पैसे गुंतवणारे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहे.आपले पैसे परत मिळावावेत म्हणून ते सांगलीत ठाण मांडून आहेत.
ज्यांचे पैसे जागृती अ‍ॅग्रो फुडस्मध्ये अडकले आहेत,त्यांनी पोलीसांत सरळ तक्रार द्या,तसेच राज्याच्या आर्थिक फसवणूक विभागाकडे तक्रार नोंदवा.त्याचबरोबर भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे निवेदन पाठवा...

...................

बेरक्याचा फेसबुक Account आणि ई मेल हॅक करण्याचा अयशस्वी प्रयत्न सांगलीत करण्यात आला.असे कितीतरी अयशस्वी प्रयत्न यापुर्वी झालेले आहेत.
सांगलीत एक चिटफंड कंपनी आहे.या कंपनीचे वतीने पुण्यात न्यूज चॅनल चालवण्यात येत होते.मात्र सहा महिन्यातच चॅनल बंद पडले .. कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचे पेमेंट मिळाले नव्हते तसेच अनेक देणी थकली आहेत म्हणून डबा गुल झाला .. 
या चॅनलमध्ये जवळपास 70 कर्मचारी आहेत.10 ते 12 लोचट कर्मचारी सोडले तर सर्व मालकांच्या विरोधात गेले आहेत.त्यात आय.टी.टीम मालकांचे पाय चाटते म्हणे.त्यांनीच हा उद्योग केला असावा असा आमचा संशय आहे.
अरे मुर्खानो,तुमच्यासारखे आय.टी.शिकणारे किती तरी बेरक्याने कोळून पेले आहेत.असा धंदा यापुढे केला तर बेरक्या तुम्हाला पुरून उरल्याशिवास राहणार नाही,हे ध्यानात घ्या ....
थू तुमच्या लोचटपणावर...

हाच तो अलर्ट मेसेस...
Hi बेरक्या उर्फ,
Your Facebook password was reset using the email address berkya2011@gmail.com on Saturday, July 18, 2015 at 8:37pm (UTC+05:30). 
Operating system: Windows
Browser: Chrome
IP address: 117.200.216.84
Estimated location: Sangli, MH, IN