'शेतक-यांची बोगस बोंब` वरुन विधानसभेत सर्वपक्षीय 'बोंब'..

नागपूर  - शेतीला काळी अाई शब्दाचा वापर शेतकरी भावनेतून वापरतो. शेतक-यांना हीन ठरवणारे लेखन कदापी सहन केले जाणार नाही. स्त्रीधनाचा उल्लेख देखील अनुचित असून अडचणीतील शेतक-यांना धीर देण्याएेवजी नाउमेद करणे कोणीही सहन करणार नाही असे सांगत सर्वपक्षीय दै. लोकसत्तामधील `शेतक-यांची बोगस बोंब` या अग्रलेखाचा निषेध केला.
विधानसभेत काल (ता.१८) प्रश्नोत्तराच्या तासानंतर पारनेर (जि. अ.नगर) चे अामदार विजय अौटी यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
राष्ट्रवादीचे अामदार जितेंद्र अाव्हाड यांनी संपादकीय लेखावर स्थगन प्रस्ताव दाखल केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखाचा निषेध करत ही भाषा शेतक-याला हीन दाखवण्याची असून
संकटात सापडलेल्या शेतक-यांला अागीत तेल अोतण्याचा प्रकार अाहे. शेतक-याला संकटात धीर देण्याची गरज असून
माध्यमांच्या चौथ्या स्तंभाने जबाबदारी अोळखून पुढे जायला पाहीजे अशी भुमिका मांडली.
अा. जितेंद्र अाव्हाड म्हणाले, समाजातील एका वर्गाला शेतकरी कायम गुलाम राहावा असे वाटते.
शेतक-यांची लक्तरे काढण्याचा हा प्रकार असून पक्षीय अभिननिवेश बाजूला ठेवून काळ्यात मातीत जन्मलेल्या प्रत्येकाने याचा
निशेष केला पाहीजे असे सांगितले.
अा. विजय अौटी म्हणाले, संपादकीय भाषा संसदीय नाही. काळी अाई शब्द शेतकरी भावनेतून वापरतो. त्याची चेष्टा करण्याचा
प्रयत्न केलाय. अडचणीतील शेतक-याला सरकारने पॅकेजच्या रुपाने पाठींबा दिला.
त्याची टिका करण्याचा अधिकार यांना कुणी दिला. लोकसत्ताचे संपादक गिरीष कुबेर यांच्या
नावाचा उल्लेख करत अा. अौटींनी शेतकरी राजकीय दृष्ट्या सक्षम असतो तर संपादकांच्या
पोटात का दुखते असा सवाल उपस्थित केला.
राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या संपादकीय लेखाचा निषेध करत सभागृहाच्या नेत्यांनी भुमि्का स्पष्ट करण्याची मागणी केली.
अामदार गुलाबराव पाटील म्हणाले, संपदकीय लेखातून शेतक-यांची लक्तरे काढली. शेतकरी
७ जूनला धुळपेरणी करतो अाणि अाकाशाकडे पाहतो. पाऊस अाला नाहीतर बियाणे वाया जाते.
ही पेरणी म्हणजे लॉटरी अाहे. लागली तर लागली. हे लक्षात ठेवा शेतकरी राहीला नाही तर `लोकसत्ता` चालणार नाही.
हा अग्रलेख शेतक-यांचा अपमान अाहे. शेतक-यांचा अपमान सहन केला जाणार नाही.
अा. अाशिष शेलार यांनी व-त्तपत्र स्वातंत्र्याची मर्यादा असल्याचे सांगत दुस-यांच्या स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये असे सांगितले. सदर वृत्तपत्राला पाठवलेल्या उत्तरात
शब्दाच बदल केल्याचे त्यांनी सांगितले.
छगन भुजबळ यांनी शेतक-यांची बॅंकाची खाती तपासा- कर्जबाजारी कसे अाहेत हे समजेल.
दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक अाले. शेतकरी ढसाढसा रडतोय. शेतकरी गेली पाच वर्ष निसर्गचक्रापुढे हतबल झालाय.
मदतीचे पॅकेज जाहीर करणे मुर्खपणा असून संपादकाने मिडीयावर शरसंधान केल्याचे भुजबळ म्हणाले.
-------------------
वातानुकुलीत यंत्रणेत बसून केलेले लिखान ः बाळासाहेब थोरात
लोकसत्ताचा अग्रलेख दुर्देवी अग्रलेख असून दुष्काळात गारपीटीचे संकट शेतक-यावर कोसळले असताना
शेतक-याला मदतीचे धोरण सरकारचे अाहे. स्वतः मुख्यमंत्री शेतात जाऊन परीस्थिती पाहीली अाहे.
मुंबईत एसीमध्ये बसून महाराष्ट्राच्या परीस्थितीचा अंदाज करुन भाष्य करणे अत्यंत चुकीचे अाहे.
संपादकांनी गावात बसून संपादकीय लिहीले असे तर त्यांना वेदना कळाल्या असत्या. शेतक-यांकडील
दागीने हे त्यांच्या अाया- बहीनींचे दागिने स्त्रीधन असते. कुटुंब अडचणीत असताना स्त्रीधन विकून किंवा
गहान ठेऊन गरज भागविली जाते. याचा उल्लेख करने योग्य नाही.
-----------------
जितेंद्र अाव्हाड ः हा प्रकार शेतक-यांची टिंगल टवाळी करण्याचे पाप अाहे.
अाईची टिंगळ टवाळी केली अाहे ते पाप अाहे. शेतीसाठी कर्ज कुठून घेतले ते कृषी सेवा केंद्रावर जाऊन चौकशी करा.
दुष्काळामुळे अनेकांनी गावे सोडली स्थलांतरीत झाले. शेतक-यांचे उत्पन्न कष्टाचं देणं अाहे.
कष्टाचा घाम अाहे. अशा लेखकांना धडा शिकावयला हवा.
-------------------
शेतक-याला हीन दाखवण्याची संपादकीय भाषा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्टाने वृत्तपत्र स्वातंत्र्यावर कधीही घाला घातला नाही. स्वातंत्र्याच्या मर्यादा संविधानाने स्पष्ट केल्यात. त्यानुसार दुस-याच्या स्वातंत्र्यावर गदा अाणता येत नाही.
राज्यातील शेतकरी सातत्याने अडचणीत अाहे. शेतकरी अात्महत्या होत अाहेत. स्वखुशीने कोणीही अात्महत्या करत नाही. वाईट परीस्थिती अाणि निराशेमुळे जीवन संपण्याची वेळ येते.
जगण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतरच शेतकरी अात्महत्या करतो. अशा परीस्थितीत शेतक-याला धीर दिला पाहीजे.
त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहीले पाहीजे. निराशेतून बाहेर ये ही भावना शेतक-यापर्यंत पोचली पाहीजे.
राजकारण्यांवर केलेली टीका अाम्ही सहन करु. राज्यातील संकटग्रस्त शेतक-यांवर टीका करणे उचित नाही.
शेतक-याला हीन दाखवण्याची भाषा असून एकप्रगारे अागीत तेल अोतण्याचा प्रकार अाहे.
या भाषेचा सर्वच स्तरातून निषेध झाला पाहीजे. विधानसभा सभागृहातून ही भावना जावी अाणि
चौथ्या स्तंभाने जबाबदारी अोळखून यापुढील काळात पुढे जायला पाहीजे.
---------------
५ एकर जिरायत शेती पिकवून पत्नीच्या अंगावर सोने चढवून दाखवा ः अा. विजय अौटीचे अाव्हान
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मी माझी स्वतःची ५ एकर जिरायती शेती देतो.
त्याने ही शेती करुन दाखवावी. अाणि त्यांच्या पत्नीच्या अंगावर सोने घालून दाखवावे असे अाव्हान त्यांनी दिले.