प्रहार मध्ये अनेकांची 'हार'

मुंबई - महेश म्हात्रेंनी खास दृष्टी मिळवून दिलेल्या  प्रहारमध्ये अनेकांची  हार  होऊ  लागली आहे. एकेकाळी कर्मचार्‍यांनी गच्च  भरलेले प्रहारचे कार्यालय मागील काही दिवसांपासून सुने..सुने भासू लागले आहे.
 राणेनी एकेकाळी मुंबईतील मिडीयात सर्वाधिक पगार आपल्या कर्मचार्‍यांना दिले. (आता पगार वेळेवर होत नाहीत, हा भाग वेगळा ) सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न केला. दक्षिण मुंबईतील परेल सारख्या महागड्या भागात अलिशान कॉर्पोरेट ऑफीस उभे केले. मुंबईतील अनेक मोठ्या पत्रकारांना प्रहारमध्ये आणले.  म्हापसेकर यांच्यासारखे जाणते कला आर्टिस्टही अगदी हसत..हसत प्रहारमध्ये दाखल झाले. त्यामुळे मुंबईच्या मिडीयात प्रहारचा वकूब काहीसा औरच होता. प्रहारमध्ये जॉब करतो ही मुंबईतील पत्रकारांसाठी अभिमानास्पद बाब होती, ते वैभव कर्मचार्‍यांवर अती विश्‍वास टाकल्यामुळे आता  काळवंडत चालले आहे.
 याबाबत छोटे मालक खुद्द नितेश  राणेनी लक्ष घालूनही कर्मचार्‍यांची गळती थांबायला तयार नाही.एका जोडगोळीच्या जाचाला कंटाळून अनेकांनी प्रहारला रामराम ठोकला तर अनेक जण सोडण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही जोडगोळीची दहशत इतकी सर्वदूर पसरली आहे की, आठवडाभर जाहीरात देवूनही कोणी प्रहारकडे फिरकेनासे झाले आहे. ( एकेकाळी जाहिरात प्रसिध्द होताच कार्यालयात रांगा लागत)  एक 'कर' तर अगदी खालच्या थराला जावून महिला कर्मचार्‍यांना अश्‍लिल भाषेत सुनावत असल्याने अनेकींनी थेट राजीनामा देवून दुसर्‍या वृत्तपत्राची वाट धरली. ( त्यामधील एक पोलीस स्टेशनची पायरी चढता चढता थांबली… ) दोन उपसंपादक आणि एका आर्टिस्टला तर काही न सांगताच काढून टाकले.
 झी चोवीस तास मधून हाकलण्या अगोदर तेथे गेलेल्या एका 'करा'ला धड एक कॉपी नीट लिहता येत नसताना त्याला न्यूज हेड बनवून व्यवस्थापनाने आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे.  हा कर प्रत्येकाशी सिंगल मिटींग घेवून कार्यालयातील जुन्या कर्मचार्‍यांना टार्गेट करतोय. आता राज्यातील विधानसभेच्या निवडणुका त्यात दैनिकाचा वर्धापन दिन ( 8 ऑक्टोबर) तोंडावर आलेला असताना ही अवस्था झाल्याने छोटे मालक तथा नितेश साहेबांचा पारा चांगलाच वाढला आहे, त्यांनी शुक्रवारी कार्यालयात येवून दोन म्होरक्यांची चांगलीच कानउघडणी केली. मागील वर्षी एकाने   सर्व कार्यालयीन यंत्रणा वापरून आपला खाजगी दिवाळी अंक येथेच बनवला होता आता या वर्षी असे प्रकार खपवून घेणार नाही असेही त्यांना छोट्या मालकांनी सुनावले. आता नवीन संपादक कोण येतात याकडे कर्मचार्यांना छळनाऱ्या त्रिकुटाचे लक्ष लागले आहे, ते आले की आपली खाट पडणार याची धास्ती त्यांना लागून राहिली आहे.