कुमार केतकर यांचा दिव्य मराठीचा राजीनामा

मुंबई - दिव्य मराठीचे मुख्य संपादक कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.केतकर यांचा राजीनामा मंजूर झाल्याचेही वृत्त आहे.केतकरांनंतर दिव्य मराठीचा मुख्य संपादक कोण होणार,याबाबत मीडियाचे लक्ष वेधले आहे.
दिव्य मराठीची पहिली आवृत्ती औरंगाबादहून चार वर्षापुर्वी सुरू झाली.तेव्हापासून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर मुख्य संपादक होते.मार्च १३ मध्ये त्यांचा तीन वर्षाचा करार संपला होता,पण पुन्हा एक वर्षाचा करार वाढविण्यात आला होता.त्यांचा नविन एक वर्षाचा करार मार्च २०१४ मध्ये संपणार होता,परंतु दोन महिने अगोदरच केतकर यांनी राजीनामा दिला आहे.त्यांचा राजीनामा व्यवस्थापनाने मंजूरही केल्याचे वृत्त आहे.
दिव्य मराठीचा राजीनामा दिल्यानंतर केतकर आता अन्य वृत्तपत्रांत जाणार की,काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करणार,याकडे लक्ष वेधले आहे.कुमार केतकर पुन्हा लोकमतमध्ये जाणार असल्याचीही चर्चा जोरदार सुरू आहे.

दिव्य मराठीचे मुख्य संपादक कोण ?
केतकर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या दिव्य मराठीच्या  मुख्य संपादकपदी प्रशांत दीक्षित किंवा भारतकुमार राऊत यांची निवड होवू शकते.
दीक्षित हे ऑलरेडी गेल्या एक वर्षापासून संपादक म्हणून दिव्य मराठीत कार्यरत आहेत,तर भारतकुमार राऊत यांची जानेवारीअखेर खासदारकीची मुदत संपत असल्याने त्यानंतर ते पत्रकारितेत पुन्हा सक्रिय होणार आहेत.